गावातील सर्व नागरिकांना कळवण्यात येते की दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता ग्रामपंचायत सभागृहात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व ग्रामस्थांनी वेळेवर उपस्थित राहावे.
सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले e-KYC ग्रामपंचायत संगणक कक्षात किंवा सीएससी सेंटरवर दि. ३१ ऑगस्ट पूर्वी पूर्ण करून घ्यावे.
दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्य पाण्याच्या टाकीची स्वच्छता करण्यात येणार असल्याने त्या दिवशी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत पाणीपुरवठा बंद राहील. नागरिकांनी सहकार्य करावे.